रविवार, २५ एप्रिल, २०२१

सिहाबींची 'नमाज' मधील एकाग्रता - विशेष मराठी लेख

सिहाबींची 'नमाज' मधील एकाग्रता

डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       पैगंबर साहेबांच्या असलेल्या सोबतींची संख्या एक लाख चोवीस हजारांच्या आसपास होती. जी व्यक्ती ईमानच्या स्थितीत म्हणजे इस्लाम धर्म स्विकारून पैगंबराच्या सहवासात राहिली किंवा त्यांचे दर्शन जरी घेतले, अशा व्यक्तींना 'सिहाबी' म्हणजे पैगंबरसाहेबांचे सोबती म्हणतात.


       हे सिहाबी रणांगणात शत्रूवर तुटून पडायचे; परंतु तोच शत्रू जेव्हा जेरबंद व्हायचा तेव्हा त्याच्याबरोबर आपल्या बंधुप्रमाणे प्रेम करायचे. स्वतः उपाशी राहून त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायचे. युध्द मैदानात उत्तम सेनानी, कुटूंबात ते प्रेमळ पिता, पती, बंधू आणि नातेवाईक असायचे. अल्लाहजवळ प्रार्थनेच्या वेळी दुवा मागताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटायचा. पैगंबर साहेबांचे प्रवचन व आदेश ऐकताना ते स्तब्ध व शांतचित्त असायचे. नमाजमध्ये त्यांची एकाग्रता कमालीची होती.


       खैबरच्या युध्दात हजरत अली नावाच्या एका सिहाबीच्या गुडघ्यात बाण रूतला. बाण निघेना, वेदना अनावर झाल्या. हजरत अली म्हणाले, "थांबा नमाजकरिता उभा राहतो, तेव्हा बाण काढा". सैनिकांनी तसेच केले. बाण केव्हा काढला गेला, समजलेसुध्दा नाही. नमाजमध्ये ते अल्लाहच्या सान्निध्यात विलीन व्हायचे. आज आपल्यापाशी इस्लामचा जो कांही ज्ञान, वारसा, संपूर्ण शरीअत, पवित्र कुरआन, हदीस, संस्कृती, शिष्टाचार, रीतीरिवाज, परंपरा, उपासना आणि प्रार्थनापध्दती आहे ते सर्व कांही आपणापर्यंत सिहाबींच्या मार्फतच पोहोचले आहे.


असे होते सिहाबींचे अस्तित्व..!


1 टिप्पणी: