रविवार, १८ एप्रिल, २०२१

'नमाज' - विशेष लेख


'नमाज' मुळे जीवनाला नवी दिशा मिळते

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       नमाज दिवसातून पाच वेळा पडावी लागते. ही प्रार्थना प्रत्येक मुस्लिम बांधवावर सक्तीची आहे. पहाटे सूर्योदयापूर्वी - तुवह की नमाज, दुपारी दीडच्या सुमारास - जोहर की नमाज, सायंकाळी पाचच्या आसपास - असर की समाज, सायंकाळी सूर्यास्तानंतर - मगरीब की नमाज, रात्री नऊच्या सुमारास - ईशा की नमाज पडावी लागते. जो या पाचही नमाज पडत असेल त्याच्याजवळ फावला वेळच उरत नाही. नमाज पडायला प्रत्यक्ष १०-१५ मिनिटे लागतात, परंतु नमाज पडण्यासाठी मानसिक व शारिरीक तयारी करण्याकरीता बराच वेळ लागतो. नमाज पडल्यानंतर त्याचा परिणाम दुसऱ्या नमाजपर्यंत मनावर टिकून राहतो.


       नमाजसाठी मशिदीचे वातावरण इतके शांत, खुले-खुले आणि प्राणवर्धक व तेजस्वी असते की त्यामुळे आत्मिक शांती प्राप्त होते. त्यामुळे विचारसरणीत बदल घडून येतो. नमाजी ईश्वराच्या जवळ जातो. त्याला संसारिक जीवन व त्यासाठी सतत झटणे दुय्यम दर्जाचे वाटू लागते. अल्लाहच्या आशिर्वादामुळे भाविकांना नवनवीन कल्पना सुचतात. त्याचे काम सोपे होते. कामातील कठीणपणा नाहीसा होतो. कुकर्म सतत झाल्यामुळे पुण्याई वाढते. नमाजमुळे अबालवृध्दांना एक दिशादर्शी जीवन जगण्यास मदत होते.


1 टिप्पणी: