गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५

हे वरदविनायका

                          हे वरदविनायका

 


  

     हे वरदविनायका

    तू सत्वर धावत ये

    अंधार फार झालाय

     त्यांना प्रकाश देण्या ये।


जनता वाईटाकडून

वाईटाकडे जातेय

विज्ञानाचा या अघोरी

उपयोग करतेय ।


बाँबस्फोट, भ्रष्टाचार

सर्वत्र बोकाळलाय

मारामाऱ्या, खून,चोऱ्या

धुमाकूळ चाललाय ।


मानवालाच तू मन

अन् विवेक दिलास

मानवाच्या मनातील

माया,ममता खलास ।


आईबाप वृद्धाश्रमी

बाळे पाळणाघरात

राहताहेत दुःखाने

अश्रू गिळून मनात ।


विद्यामंदिरातही या

गलिच्छ प्रकार घडे

साऱ्या नात्यांचे आदर्श

बेशुद्ध होऊन पडे ।


मोबाईल विळख्यात

गुरफटलीय जनता

आपुलकी व जिव्हाळा

नाही राहिली ममता ।


म्हणून ....

हे वरदविनायका

तू सत्वर धावत ये।